त्यातली काही असतात कलंदर...
जीवन स्वच्छंदी जगण्यासाठीच आहे असं मानणारे...उन्मुक्त फुलपाखरासारखे...!
काही असतात, जीवनालाच आव्हान देणारे... वाईट गोष्टींचा विचारही नाही... फक्त आला काळ मनस्वीपणे जगायचं माहित...
अशी माणसंच संजीवनी देऊन जातात... सहवासात येणार्या
प्रत्येकाला आशेचा एक किरण दाखवून...
कितीही संकटं आली तरी यांची प्रसन्नता लोप पावत नाही.
जबरदस्त इच्छाशक्ती आणि विजिगिषू वृत्तीच यांना तारते.
आश्चर्याने थक्क होऊन थकायची वेळ येते...
आनंदाची छोटी छोटी बीजंच पेरतात बहुतेक ती...
आपली छोटी-मोठी दुःखं आत ठेवून चेहर्यावर निर्व्याज हसू कसं काय आणतात? हा एक मोठ्ठा प्रश्न आहे मला पडलेला...!
पण ते हसू जादुई असतं खरं...
कारण...? कारण...
त्यांचा जीवनाबद्दल एक निश्चित विचार असतो. मिळालेल्या आयुष्यावर नितांत प्रेम करतच जगत असतात अशी माणसं... अवघ्या सृष्टीतल्या मांगल्याविषयीचा त्यांचा विश्वास दृढ असतो....आणि...
त्यांनाच आयुष्याचं खरं मोल कळलेलं असतं...
- रश्मी.
Dukhh pratykalach aste...pan te lapaun jagala aanand denare lok niralech.....
ReplyDeleteVichar aavadle.....
खरे आहे तुमचे, हिंदीत त्याला "हरफ़न्मौला" असा शब्द चपखल बसतो, ही माणसे आनंदाची खाण असतात, अन वैयक्तिक त्रास कधीच कवटाळत नाहीत
ReplyDelete