
आपल्या रोजच्या जगण्यात असंख्य गोष्टी घडत असतात. अनुभव, प्रसंग, भेटीगाठी, ओळखी.... यातूनच घडत जातो, समृद्ध होत जातो आपण... आपल्याला ते कधी कधी कळतही नाही. पण अचानक कधीतरी जाणीव होते , '' अरेच्चा ! कुठून शिकलो आपण हे सगळं ? '' हे समृद्धपण असं सुखद आश्चर्याचा धक्का घेऊन आपल्या समोर येतं, अगदी अनपेक्षितपणे...! पण त्याचं वेळी दुसऱ्या बाजूला एक रितेपण जाणवत राहत. अजून कित्ती पोकळी भारायचीये आपल्यातली कोण जाणे ? असं वाटत राहतं. पण हीच तर खरी सुरुवात असते, जगण्याची आणि भरण्याची सुद्धा.... फक्त गरज असते ती टिपकागदी मनाने ' जे जे उत्तम ' ते ते वेचायची. नव्या, जरा आगळ्या दृष्टीने जग बघायची. मनापासून व्यक्त व्हायची. तेव्हाच आपण खरेखुरे ' जगत जातो, भरत जातो ' . बोरकरांनाही कदाचित हेच वाढणं अपेक्षित असावं.
ज्या दिवसापासून आपल्या अशा वाढण्याची सुरुवात होईल त्या दिवशी तो आपलं खराखुरा ' वाढ ' दिवस म्हणायला हवा आणि असा दिवस रोजच यावा. :) :)
No comments:
Post a Comment